कारले
कारले
कारल्याची भाजी म्हटले की आपण लगेच नाक मुरडतो. कारलं कडू असल्याने त्यांची भाजी खाण्यास अनेकांना रस नसतो. पण कारले खाण्याचे फायदे जर तुम्हाला एकदा कळाले तर तुम्ही कारल्याच्या भाजीला कधीही नाही म्हणणार नाही.
परंतु कारले कडू असले तरी ते आरोग्यासाठी तेवढेच बहुगुणी आहे. त्वचारोग, मधुमेह, डोळ्यांचे आजार यासारख्या समस्यांवर कारले उपयोगी आहेत. आज जाणून घेऊया कारल्याचे फायदे…
कारलं हे आपल्या शरीरातील रक्त साफ करतं. सोबतच मधुमेहाच्या रुग्णांसाठीही कारलं फायदेशीर असतं. तसेच दमा, पोटदुखी या आजारांवरही हा रामबाण उपाय आहे.
रक्तातील शुगर लेव्हल नियंत्रित ठेवणं
कारल्याचा वापर एका नैसर्गिक स्टेरॉयडच्या रुपात केला जातो. कारण यात केरेटिन नावाचं रसायन अधिक प्रमाणात आढळतं. या सेवन केल्यास रक्तातील शुगर लेव्हल नियंत्रित राहते.
पोषक तत्वांचा भांडार कारलं
कारल्यामुळे शरीरातील शुगर लेव्हल जितकी नियंत्रित केली जाते, तितकं शरीराला पोषक तत्व मिळतात. त्यासोबतच कारल्यात तांब, व्हिटॅमिन बी, अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडसारखे तत्व असतात. यामुळे रक्त साफ स्वच्छ राहतं आणि किडनी सुद्धा निरोगी राहते.
कारलं खाण्याचे फायदे
* कफचा त्रास असलेल्यांना कारलं खाल्ल्ल्यांने आराम मिळतो.
* दमा असल्यास विना मसाल्याची भाजी खाल्ल्यास फायदा होतो.
* पोटात गॅसची समस्या किंवा अपचन झालं असेल तर कारल्याने आराम मिळतो.
* लखवा गेलेल्या रुग्णांनी कच्च कारलं खाल्ल्यास फायदा होतो.
* ओमोटींग, पोटात दुखणे यांसारखे त्रास होत असेल तर कारल्याच्या रसात पाणी आणि काळं मिठ घालून प्यायल्यास लगेच आराम मिळतो.
* काविळ झालेल्यांना आराम मिळण्यासाठीही कारलं फायदेशीर आहे. त्यासाठी रुग्णांनी कारल्याचा रस घ्यावा.
* कारल्यांच्या रसाचा लेप डोक्यावर लावल्यास डोकेदुखी दूर होते.
* तोंडात फोडं आल्यास कारल्याचा रसाने गुरळा करा, याने आराम मिळेल.
* रोज एक ग्लास कारल्याचा रस प्यायल्यास शरीरातील पचनक्रिया व्यवस्थित होते. कारल्याने भूक लागते आणि वजन कमी होण्यासही मदत होते.
* कारले शरीरातील साखरेवर नियंत्रण ठेवते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारले अतिशय उपयुक्त आहे. सकाळी उपाशी पोटी कारल्याचा रस पिणे मधुमेहासाठी रामबाण उपाय आहे.
* हिरव्या भाज्या डोळ्यांसाठी जेवढ्या चांगल्या असतात. त्याचप्रमाणे कारल्याचा रस प्यायल्यास डोळे निरोगी राहतात. कारले खाल्ल्याने डोळ्यांचे आजार होत नाहीत.
* उलट्या किंवा जुलाब होत असेल तर कारल्याच्या रसात थोडे पाणी टाकून त्यात काळे मीठ टाकून सेवन करावे, यामुळे फरक पडतो.
* पक्षाघात झालेल्या रुग्णांना कच्चे कारले फायदेशीर ठरते. दमा असलेल्यांनी मसाला न टाकलेली कारल्याची भाजी खावी, फायदेशीर ठरते. कारल्यामुळे रक्तशुद्ध होण्यास मदत होते.
* कारल्याच्या ज्युसमध्ये जर लिंबू मिसळून प्यायल्यास चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल्स आणि त्वचेच्या आजारापासून मुक्ती मिळते.
* हृदयरोगासाठी कारले अतिशय उपयुक्त ठरते. यामुळे हृदय मजबूत होऊन हृदयरोगापासून बचाव होतो. शिवाय कावीळ सारख्या आजारांसाठीही उपयुक्त असते.
* कारल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. एक ग्लास कारल्याचा रस आणि त्यात अर्धा लिंबू टाकून प्यायल्यास अनेक आजारांवर मात करण्याची ताकद मिळते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा