पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*ज्योतिष्यशास्त्रानुसार भाग्यदायी वृक्ष*

*ज्योतिष्यशास्त्रानुसार भाग्यदायी वृक्ष* हिंदू धर्मामध्ये झाडाला देवता स्वरूप मानण्यात आले आहे. ज्योतिषानुसार काही झाडे असेही आहेत, ज्यांची निगा राखल्याने, पाणी दिल्याने आणि पूजा केल्याने सर्व समस्या दूर होऊ शकतात. हे वृक्ष तुमचा भाग्योदय करू शकतात.  *१. तुळस* ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते. देवी लक्ष्मी अशा घराला सोडून कधीही जात नाही. अशा घरामध्ये नेहमी सुख-समृद्धी राहते. *२. पिंपळ* हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला पूजनीय मानण्यात आले आहे. या झाडाची पूजा केल्याने शनी दोषातून मुक्ती मिळते भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. *३. वड* याला वड किंवा वटवृक्ष असेही म्हणतात. या झाडाची पूजा केल्याने महिलांचे सौभाग्य अखंड राहते आणि अपत्याशी संबंधित सर्व दोष दूर होतात. *४. आवळा* या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि पूजा करणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत नाही. *५. बिल्व* या झाडाची पाने आणि फळ महादेवाला अर्पण करावेत. या झाडाची पूजा केल्याने नोकरीत प्रमोशनचे योग जुळून येऊ शकतात. *६. केळी* ज्या लोकांच्या कुंडलीत गुरु ग्रहाशी संबंध...

कोणत्या झाडाची पूजा केल्याने काय फळं मिळतात...?

कोणत्या झाडाची पूजा केल्याने काय फळं मिळतात...?  *तुळस* – *ज्या घरात रोज तुळशीची पूजा होते, *लक्ष्मी ते घर कधीच सोडून जात नाही. त्या घरात नेहमी सुख समृद्धी बनलेली असते.*  *पिंपळ* – *हिंदू धर्मात पिंपळाला पवित्र वृक्ष मानण्यात आले आहे. याची *पूजा केल्याने शनी दोषापासून मुक्ती मिळते, तसेच विष्णूची कृपा सदैव तुमच्यावर राहते.*  *कडू लिंबं* – *याची पूजा केल्याने *पत्रिकेतील सर्व दोष दूर होतात व आजारांपासून मुक्ती मिळते. घरात सुख शांती कायम राहते.*    *वडाचे झाड* – *याला वडाचे झाड किंवा बरगद देखील म्हणतात. याची पूजा केल्याने *स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहतं आणि संतानं संबंधी समस्या दूर होण्यास मदत मिळते. हे फारच पवित्र झाड आहे.*   *बेलाचे झाड* – *या झाडाचे पान आणि फळ महादेवाला अर्पित केले जाते. याची *पूजा केल्याने नोकरीत बढतीचे योग लवकर येतात तसेच अकाल मृत्यूपासून रक्षा होते.*  *आवळा* – *या झाडाची पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न राहते आणि *पूजा करणार्‍यांना धन संबंधी अडचण कधीच येत आहे. त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळत.*  *अशोक* – *या झाडाची पूजा केल्...

🔯 *!!...महावृक्ष आणि दिशा...!!* 🔯

🔯 *!!...महावृक्ष आणि दिशा...!!* 🔯 वृक्षायुर्वेद ग्रंथात सूरपाल म्हणतात-  जे देवालय, मठ आणि घर हे सूर्यकिरण व वारायांपासून वंचित राहतील ते शुभ फल देणार नाहीत. सूरपाल म्हणतात, दहा पुत्रासमान असतो एक वृक्ष. कोणत्याही  वृक्षाची सावली घरावर पडू नये आणि सोनं देणारा जरी वृक्षअसेल तरी त्याची सावली मुख्य प्रवेशद्वारावर पडू नये. दरवाजाच्या अगदी समोर झाड येणं हा महादोष आहे, त्यामुळे द्वारवेध होतो, अनिष्ट फळं मिळतात. सर्वच प्राचीन ग्रंथकारांनी वड (न्यग्रोध), पिंपळ (अश्वत्थ), औदुंबर आणि पाकर (प्लक्ष) या चार महावृक्षांचा विशेष विचार केला आहे.... पूर्वेला वड, पश्चिमेला पिंपळ, उत्तरेला प्लक्षआणि दक्षिणेला औदुंबर शुभप्रद असतात. पण यापेक्षा वेगळ्या दिशेलाहे वृक्ष असतील तर?.. तर लक्षात ठेवा की, हे यज्ञीय वृक्ष आहेत. चुकीच्या दिशेत आलेला एक वृक्ष संपूर्ण प्लॉटमध्ये महादोष उत्पन्न करूशकतो. विपरीत दिशांना महावृक्ष असता मिळणारी फळे... *वड* - स्त्रीपिडा,राज्यकर्त्यापासून त्रास. *पिंपळ* - भय , अनारोग्य . *प्लक्ष* - पराभव , हानी ,  प्रगतीत खंड.  *उंबर* - नेत्र पिडा , धनहानी.   चुकीच्या...

गणेशपुजनात वापरण्यात येणार्‍या २१ पत्री आणि त्यांचे औषधी उपयोग...

गणेशपुजनात वापरण्यात येणार्‍या २१ पत्री आणि त्यांचे औषधी उपयोग... १. मधुमालती (Hiptage benghalensis) औषधी उपयोग: पानांचा वापर जखम, सूज, कुष्ठरोग, कफ, संधिवात यावर करतात. २. माका (Eclipta Alba) औषधी उपयोग: यकृताची सूज, कावीळ, मूळव्याध, सांधेदुखी व त्वचेचे जुनाट आजार यावर माका उपयुक्त. केसांच्या आरोग्यासाठी याचे तेल उपयुक्त. ३. बेल Aegle Marmelos औषधी उपयोग: बेलफळ अतिसार, आतड्यांचे विवकार यावर गुणकारी. पानांचा रस मधुमेहावर उपयुक्त. ४. दुर्वा (Cynodon Dactylon) बुद्धीवर्धक , शक्तीवर्धन , थडं गुणाच्या आहेत. दुर्वाच्या रसाने, लेपनाने त्वचेचा दाह कमी होतो. आम्लपित्तावरही दुर्वाचा रस उपयुक्त. डोळ्यांचे विकार, सर्दी-खोकला यावर गुणकारी. ५. बोर (Zizyphus Mauritiana) फळे, बिया, पाने, खोड हे सर्व भाग औषधी. कफ, पित्त, ताप, त्वचारोग, अतिसार यावर उपयुक्त. ६. धोतरा (Datura metel) त्वचारोग, डोळ्यांचे विकार, मूळव्याध, मूतखडा यावर गुणकारी ७. तुळस (Ocimum sanctum) सर्दी-खोकल्यासाठी पानांचा काढा गुणकारी. अपचन, ढेकर, पोटदुखी, कानदुखी यावरही पानांचा रस उपयुक्त. ८. आघाडा (Achyranthes aspera) मूळव्याध, पोटाचे ...

*राशी अनुसार कुणी कोणते वृक्ष लावावेत*

*राशी अनुसार कुणी कोणते वृक्ष लावावेत*   *मेष*=   खैर / आवळा/ रूई          *वृषभ*= औदुंबर/ जांभूळ/ खैर     *मिथून*=चंदन/ वेळू/ लिंब          *कर्क*=पिंपळ/नागचाफा/पळस            *सिंह*=रूई / वड/ पळस             *कन्या*=नारळ/ बेल/ जाई          *तुळ*=अर्जुन/ बेल/औदुंबर           *वृश्चिक*=खैर/ सौंदड/ बेल          *धनु* = फनस/ पिंपळ/ वेत              *मकर*= रूई / शमी/ वड           *कुंभ*=आंबा/ कळंब/ वड           *मीन*= कडुलिंब /मोह /चंदन /वड   *टीप* :- ज्या व्यक्तींना आज झाड लावायला शक्य नसेल त्यानी.... पुष्य नक्षत्रावर, सिद्धि योगावर, उत्तरा नक्षत्रावर,आषाढी एकादशी, गुरु पौर्णिमा,             भाद्रपद श्रावण मासारंभ    ...

*मधुमेह*

*मधुमेह* 1. वाळलेले आवळे आणि जांभळाच्या बियांचा गर समप्रमाणात घेऊन त्याचे चूर्ण करावे रोज सकाळी काही न खाता ७ ग्राम चूर्ण गाईच्या दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर घेतल्याने मधुमेह बारा होतो. 2. जांभळाच्या बिया १० ग्राम आणि १ ग्राम अफू बारीक वाटून थोडे पाणी मिसळून बारीक गोळ्या तयार कराव्या. एक एक गोळी सकाळ संध्याकाळ पाण्याबारोर घेतल्याने एक महिन्यात मधुमेह बारा होतो. 3. मातीच्या भांड्यात विहिरीचे एक ग्लास पाणी भरून पळसाची ५ फुले टाकावी. सकाळी फुले कुचकारून शिळ्या तोंडाने ते पाणी प्यावे. दर आठवड्यात एक एक फुल तोडून प्रयोग केल्याने अतिशीघ्र आराम येतो. 4. रोज सकाळी रिकाम्या पोटी कडूलिंबाच्या पानाचा रस घ्यावा.  यामुळे मधुमेह काबूत ठेवणे शक्य होते. 5. फणसाच्या पानांचा रस प्रत्येक दिवस सेवन करावा. 6. लिंबाच्या कोवळय़ा पानांचा रस सेवन केल्यानंतर डायबिटीस कंट्रोलमध्ये राहते. 7. डायबिटीस झालेल्या व्यक्तीने पथ्य पाळणे, योगा करणे, दररोज सकाळी फिरायला जाणे व शुद्ध हवा घेणे. गवतावर उघड्या पायाने चालणे आदी गोष्टी केल्या तरीही मधुमेह नियंत्रणात राहतो. 8. दोन ग्रॅम दालचिनी चूर्ण आणि एक लवंग पाण्यात उकळून...

*रक्ताची कमतरता दूर करण्याचे ‘हे’ १२ प्रभावकारी घरगुती उपाय, जाणून घ्या**रक्त शुद्ध करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा*

*रक्ताची कमतरता दूर करण्याचे ‘हे’ १२ प्रभावकारी घरगुती उपाय, जाणून घ्या* *रक्त शुद्ध करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा* आरोग्यनामा ऑनलाइन टीम – थकवा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी लक्षणे अ‍ॅनिमियाची आहेत. ही समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून येते. रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यास अ‍ॅनिमिया होण्याची शक्यता असते. अ‍ॅनिमियाच्या रुग्णामध्ये लोह तत्त्व, व्हिटॅमिन बी, फॉलिक अ‍ॅसिड कमी असते. यासाठी कोणते पदार्थ खाल्ल्यास रक्ताचे प्रमाण वाढते आणि अ‍ॅनिमिया दूर होतो, हे आपण जाणून घेवूयात.   *हे उपाय करा* * दिवसातून एक वेळेस गवती चहा, दालचिनी, बडीशेप समप्रमाणात टाकून चहा तयार करून प्यावा. यामुळे रक्ताची कमतरता दूर होईल. * सकाळी अंकुरित धान्याचे सेवन करावे. * शितोपलादी चूर्ण ५० ग्रॅम, अश्वगंधा चूर्ण ५० ग्रॅम, शतावरी चूर्ण १० ग्रॅम, सिद्धमकरध्वज ५ ग्रॅम, लोहभस्म १० ग्रॅम, अष्टवर्ग चूर्ण २५ ग्रॅम, मध ३०० ग्रॅम. हे सर्व चूर्ण एकत्र करून सकाळ-संध्याकाळ ५ ते १० ग्रॅम घ्यावे. त्यानंतर दुध प्यावे. * मीठ आणि लसणाचे नियमित सेवन करावे. यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते...

*सर्वांनाच फायदेशीर पश्चिमोतानासन :-**इम्युनिटी/प्रतिकारशक्ती वाढीसाठीचे जबरदस्त आसन!*✅✅✅

*सर्वांनाच फायदेशीर पश्चिमोतानासन :-* *इम्युनिटी/प्रतिकारशक्ती वाढीसाठीचे जबरदस्त आसन!*✅✅✅ 👇 आपल्याला उचकी लागली तर पटकन पश्‍चिमोत्तानासन करावे म्हणजे उचकी लगेच थांबेल.  *सर्व रोगांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी उपयुक्त आसन......* पश्चिमोत्तानासन आसनाचा अर्थ. 'पश्चिम' या शब्दाचा एक अर्थ 'पाठीमागची बाजू' असाही होतो. या आसनात मानेपासून पायांच्या घोट्यापर्यंतच्या सर्व पाठीमागच्या शरीराच्या भागास ताण मिळतो म्हणून याला पश्चिमोत्तानासन म्हणतात. भगवान शिवशंकराचे आवडते आसन... कृती..... सपाट जमिनीवर पाय पसरून बसा. पायाचे अंगठे आणि टाचा एकमेकांना जोडून ठेवा. मान सरळ आणि समोर असावी. कमरेत वाकून हात पावलांकडे न्या. दोन्ही हातांच्या तर्जनींना हुकाप्रमाणे आकार द्यावा व त्या त्या बाजूकडील पायांचे अंगठे अडकवावे. कमरेपासून वरचे शरीर व हात ढिले करावेत. म्हणजे शरीर पुढे व खाली झुकू शकेल. कोप-यामध्ये हात वाकू लागतील. कोपरे जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करावा. मात्र डोकं गुडघ्याला टेकवू नये किंवा पायदेखील वर करू नये. अंगठे पकडता आले नाहीत तर घोटे पकडून शक्य तेवढे पुढे झुकावे. संथ श्वास चालू ठेवाव...

27 नक्षत्र मंत्र आणि वनस्पती...

27 नक्षत्र मंत्र आणि वनस्पती १) अश्विनी नक्षत्र: अश्विनी नक्षत्र देवता : अश्विनीकुमार नक्षत्र आराध्य वृक्ष : कुचला नक्षत्र पर्यायी वृक्ष : अडुळसा नक्षत्र देवता मंत्र: ॐअश्विनी कुमाराभ्यां नमः २) भरणी नक्षत्र : भरणी नक्षत्र देवता : यम – आद्य पितर नक्षत्र आराध्य वृक्ष : आँवला नक्षत्र पर्यायी वृक्ष : खैर  नक्षत्र देवता नाममंत्र:- ॐ यमाय् नमः l नक्षत्र नाम मंत्र:- ॐ अपभरणीभ्यो नमःl ३) कृतिका नक्षत्र: कृतिका नक्षत्र देवता : अग्नी नक्षत्र आराध्य वृक्ष : उंबर, औदुंबर नक्षत्र पर्यायी वृक्ष : बेहडा नक्षत्र देवता नाममंत्र:- ॐ आग्नेय नमः l नक्षत्र नाम मंत्र :ॐ कृतिकाभ्यो नमः ४) रोहिणी नक्षत्र: रोहिणी नक्षत्र देवता :ब्रम्हा नक्षत्र आराध्य वृक्ष :जामुन जांभळी,  नक्षत्र देवता नाममंत्र:- अ) ॐ ब्रम्हणे नमःl आ) ॐ प्रजापतये नमःll ५) मृगशिरा नक्षत्र: मृगशिरा नक्षत्र देवता: चंद्र नक्षत्र आराध्य वृक्ष : खैर (कात) नक्षत्र देवता नाममंत्र :- अ) ॐ चंद्रमसे नमःl आ) ॐ सोमाय नमःl ६) आर्द्रा नक्षत्र: आर्द्रा नक्षत्र देवता : रुद्र (शिव) नक्षत्र आराध्य वृक्ष : कृष्णागरू,काला तेंदू नक्षत्र देवता नाममंत्र:- ॐ...

*कफः घरगुति उपचार*

*कफः घरगुति उपचार* १) हळदपूड साजूक तूपावर मंद आचेवर भाजून एक चमचा आले व तुळशिरसात ३ वेळा. २) वारंवार कफ, सर्दि, पडसे, खोकला पडत असल्यास सुवर्ण सूतशेखर, दोन डाळिएवढे, मध, मोरावळा, किंवा दूध साखरेतून  सकाळ, संध्याकाळ. ३) रोज सकाळी व संध्याकाळि  ओवा व गूळ हळद यांचे मिश्रण जेवणानंतर चावून खाणे. ४) शक्यतो रोज गरम पाणी पिणे.  फ्रिजचे पाणि टाळावे. ५) आल्याचा रस व मध, कोरफड गर चाटण केल्यास कफ बाहेर पडेल. ६) रात्रि गरम पाण्यात त्रिफळा चूर्ण घेतल्यास या विकारातून कायमस्वरूपि सुटका होते.  *ड्रायकफ कोरडा खोकलाः*  १)  नागवेलिच्या  पानात ओव्याचे दाणे अर्धा चमचा खा. खोकला दूर पळतो. रस पिउन घ्यावा. २) कोरफडिचा गर, हळद, मध, ओवा पावडर अथवा अर्क घालून खा. फरक पडतो. ३) लसूण भाजून गूळासोबत खावि. ४) दमा व डांग्या खोकला   डाळिंबाचा रस एक चमचा, लसणाच्या रसाचे दहा थेंब व लसूण पाकळ्या ठेचून टाळुवर रस लावल्यास आराम पडतो.   डांग्या खोकला दूर पळतो.   ओवा खाण्याचे फायदे : पदार्थांची लज्जत वाढवणाऱ्या ओव्याचे औषधी गुणधर्म पा तुम्ही थक्क व्हाल.  ओवा (शास्त्रीय...

कलौंजि..( कांद्याचे बी).. काळे जीरेः।

💫💫 कलौंजि..( कांद्याचे बी).. काळे जीरेः।  हा एक असा मसाला आहे कि,, मृत्यू शिवाय,, सर्व आजार नामशेष करतो,. हिचा दैंनदिन जीवनात वापर म्हणजे ,, निरोगि,, सुद्रूढ,, आयुष्य.. प्रत्येक भाजीत चव तर आणतोच, पण पोटात जाऊन औषधी काम करतो.. ##* कलौंजि गरम पाण्यासोबत घेतल्यास, अस्थमा बरा होतो. सर्दि, दमा, खोकला, यावर गुणकारि केसांकरता फायदेशिर आहे ##* टक्कल पडत असेल तर, कलौंजि तेल आँलिव्ह तेलात मिसळून लावावे, आळा बसून केस जाण्याचे थांबते,, व नविन केस उगवतात, ,, मधूमेहाचि,, हि शत्रूच आहे,, रोज जेवणानंतर एक चमचा कलौंजि पावडर पाण्यासोबत घेतल्यास शर्करा नियंत्रित राहते,। ##*. कलौंजित, आयर्न, सोडिअम, कँलशिअम, पोटँशिअम, व फायबर विपुल प्रमाणांत असते, एमीनो अँसिड, व प्रोटिन देखिल भरपूर प्रमाणात आहे, तीव्र डोकेदुखिवर कलौंजीचे तेल मस्तकावर चोळल्यास आराम पडतो,. स्म्रूतिभ्रंश, अल्जायमर, होउ देत नाही,. ##* उच्च रक्तदाब, संतूलित राहतो, कोलेस्ट्रोलचे प्रमाण व्यवस्थित राहते,. कलौंजित ,,पोटँशिअम, चे प्रमाण जास्त असल्याने , डायबेटिस, नियंत्रणात राहतो, एक ग्लास द्राक्षांच्या रसात कलौंजि तेल मिसळून घेतल्यास ,, कँस...

ताप...

ताप – लहान बाळांना तापा असल्यास तुळसतेलाने आंघोळी आधी बाळाच्या अंगाची तेल मालीश केल्यास ताप कमी होतो. तुळशीत प्रतिजैविके आणि वेदनानाशके असतात त्यामूळे तापावर तूळसपाने खाल्ल्यानेही आराम मिळतो 2. मौखीक स्वास्थ्य टिकवणे – दातांची वेदना, मुखदुर्गंधी, चव नसणे, तोंड कोरडे पडणे या सर्वांवर तुळस पाने चावून खाल्ल्यास फार आराम मिळतो. तुळस पाने एक उत्तम मुखशुध्दीदायक मानले जाते. पुरातन काळात भोजनानंतर तुळसपानांचा स्वाद मुखशुध्दी साठी घेतला जाई. तोंडातील सूज व फोड तूळस खाल्ल्याने बरे होतात . मुखाच्या कर्करोगासाठी तुळशीची पाने खाणे आरोग्यास लाभदायक मानले जाते. 3. दातांची काळजी – तुळसपानांचा वापर दातांचे दूखणे हिरडया कमजोर होणे, दातातून रक्त येणे, दात कमजोर होणे, दात सडणे, या सर्वांवर केल जातो. तूळस पाने 5,10 मिनीटे तोंडात ठेवल्यास चांगला फायदा मिळतो. आपल्या आयुर्वेद आणि इतर ग्रंथांमध्ये यास दातांच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभकारी मानले जाते. दात ठणकत असेल तर चोळून तूळसपाने ठणकेवर ठेवल्यास ठणकेवर आराम मिळतो. 4. मुत्रपिंडातील खडक – तुळशीत विषजन्यपदार्थांना शरीराबाहेर टाकण्याचे गुण असतात त्यामूळे या गुणा...

*लसूण*

*लसूण* 1.लसूण शरीरात इन्सुलीनचे प्रमाण वाढविते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे.  2.लसणाचे सेवन कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करते. लसणामुळे रक्ताचे शुद्धीकरण होतेच, शिवाय रक्त पातळ होते. त्यामुळे रक्ताच्या गाठी निर्माण होत नाहीत.  3.लसूण हृदयाला ऑक्सिजन रॅडीकल्सच्या प्रभावापासून वाचवितो. तसेच सल्फरयुक्त गुण रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ देत नाही. अॅण्टी क्लोनिंग गुणांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत.  4.सरसूच्या तेलात लसणाच्या पाकळ्या टाकून उकळून घ्या. हे तेल कानात टाकल्यास कान दुखण्याचा त्रास कमी होतो.  5.रोज लसणाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. हवामान बदलामुळे होणा-या सर्दी आणि खोकल्यावर लसूण टाकलेला चहा गुणकारी आहे.  6.थंडी किंवा बदलणा-या वातावरणात सर्वच वयोगटातील लोकांना कफ किंवा सर्दीचा त्रास होतो. लसणाचे नियमित सेवन केल्यास अशा आजारांपासून सहज मुक्तता होऊ शकते.  7.लसणात अॅण्टी इन्फ्लामेटरी गुण आहेत. ज्यामुळे अॅलर्जीला दूर पळविता येते. लसणातील अॅण्टी आर्थिटिक गुणांमुळे डायलीसल्फाईड आणि थियासेरेमोनोने या...

*बीटामध्ये आहेत हे १० गुणकारी गुणधर्म!!*

*बीटामध्ये आहेत हे १० गुणकारी गुणधर्म!!* बीट म्हटलं की आपल्याला रक्त आठवतं. बीट खाल्याने रक्त वाढतं असा लहानपणी समज होता. तो पूर्णपणे चुकीचा नाही. बीट हे आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांवर गुणकारी आहे. जसे की उच्च रक्तदाब कमी, मधुमेह, स्मरणशक्ती, इत्यादी. बीटमध्ये आणखी काय काय गुणधर्म आहेत ज्याचा आपल्या आरोग्याला फायदा होतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. आधी बीटमध्ये असलेल्या पोषक घटकांबद्दल जाणून घेऊया. बीटचा रंग लाल असतो कारण त्यात ‘बेटालिन’ हे रंगद्रव्य आढळतं. या गुणधर्मामुळे खाण्याचा रंग तयार करण्यासाठी बीटचा वापर होतो. १०० ग्राम बीटमध्ये ८७.५८ ग्राम पाणी आणि ४३,००० कॅलरीज असतात.  *आरोग्यासाठी फायदे* *१. रक्तदाब कमी होतो* बीटमध्ये नायट्रेट असतं. नायट्रेट संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह सुरळीत करण्याचं काम करतं. नायट्रेट हे शरीरात जाऊन नायट्रिक अॅसिडमध्ये रुपांतरीत होतं. नायट्रिक अॅसिडमुळे रक्तवाहिन्य प्रसरण पावत असल्यामुळे रक्तदाब वाढत नाही. रक्तदाब कमी करण्यासाठी बीटचा रस प्यायलास उत्तम. *२. हृदयासाठी गुणकारी* बीटमधला नायट्रेट हा घटक हृदयासाठी पण तेवढाच फायद्याचं असतो. हृदयविकार आणि हृदय...

कारले

कारले कारल्याची भाजी म्हटले की आपण लगेच नाक मुरडतो. कारलं कडू असल्याने त्यांची भाजी खाण्यास अनेकांना रस नसतो. पण कारले खाण्याचे फायदे जर तुम्हाला एकदा कळाले तर तुम्ही कारल्याच्या भाजीला कधीही नाही म्हणणार नाही. परंतु कारले कडू असले तरी ते आरोग्यासाठी तेवढेच बहुगुणी आहे. त्वचारोग, मधुमेह, डोळ्यांचे आजार यासारख्या समस्यांवर कारले उपयोगी आहेत. आज जाणून घेऊया कारल्याचे फायदे… कारलं हे आपल्या शरीरातील रक्त साफ करतं. सोबतच मधुमेहाच्या रुग्णांसाठीही कारलं फायदेशीर असतं. तसेच दमा, पोटदुखी या आजारांवरही हा रामबाण उपाय आहे.  रक्तातील शुगर लेव्हल नियंत्रित ठेवणं कारल्याचा वापर एका नैसर्गिक स्टेरॉयडच्या रुपात केला जातो. कारण यात केरेटिन नावाचं रसायन अधिक प्रमाणात आढळतं. या सेवन केल्यास रक्तातील शुगर लेव्हल नियंत्रित राहते.  पोषक तत्वांचा भांडार कारलं कारल्यामुळे शरीरातील शुगर लेव्हल जितकी नियंत्रित केली जाते, तितकं शरीराला पोषक तत्व मिळतात. त्यासोबतच कारल्यात तांब, व्हिटॅमिन बी, अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडसारखे तत्व असतात. यामुळे रक्त साफ स्वच्छ राहतं आणि किडनी सुद्धा निरोगी राहते.  कार...

*आयुर्वेदीय कविता*

*आयुर्वेदीय कविता* खोकून खोकून कोरडा झाला जर का *घसा।* मधातून चाटा *हळद, ज्येष्ठमध आणि अडुळसा। लागला मुका मार, सुजून पाय झाला असेल *गारद।* लेपासाठी उगाळा *तुरटी, रक्त चंदन, आंबेहळद।।* कोंड्याचा झाला आहे कां डोक्यामधे *साठा?* केस धुतांना लावा *मेंदी, शिकेकाई, रिठा।।* सकाळी सकाळी उठा देवाला करा तुम्ही *वंदन।* उन्हाळ्यात थंडाव्यासाठी कपाळी लावा *चंदन।।* उन्हामधे रापून चेहरा झाला कां सावळा *गडद?* कांती उजळण्यासाठी दुधातून प्या थोडी *हळद।।* बारीक आहे कुडी म्हणून होऊं नको तू *बावरी।* दूध आणि साखरेबरोबर खा थोडी *शतावरी।।* पिकला एक केस होईल डोक्यावर *चांदी।* नैसर्गिक रंग आहे, केसांना लावा *मेंदी।।* केसांना लावा *कचूर सुगंधी, मेंदी, जास्वंद।*  केस होतील लांब सडक, *सुगंध दरवळेल मंद ।।* गाणं म्हणण्यासाठी झालां आहांत तुम्ही *अधीर।* गोड मधुर आवाजासाठी खा *ज्येष्ठमध, शंगीर।।* अशक्तपणामुळे तुमचा दुखतो आहे का *सांधा?* शक्तीसाठी गायीच्या दुधातून प्या *अश्वगंधा।।* पित्तप्रकोप झाला आहे, पोटातून येत आहेत कां *कळा?* पोटात घ्या *आवळा, हिरडा, बेहडा म्हणजेच त्रिफळा।। वातामुळे पोटामध्ये होत आहेत कां *वेदना...

खरे ज्येष्ठ नागरिक

*माणसाने वय वाढल्यावर जेष्ठ व्हावे, म्हातारे नाही....* *वय वाढणे हा निसर्गक्रम आहे* म्हणून आपण स्वत:ला *आता आपण म्हातारे झालो* असे म्हणू नये..... *ज्येष्ठत्व* अन् *म्हातारपण* यातील फरक समजून घ्यावे... *म्हातारपण* इतरांचा *आधार शोधीत* असते,  तर *ज्येष्ठत्व* *दुसऱ्याला आधार देते*. म्हातारपण *लपवावेसे* वाटते,  तर ज्येष्ठत्व *दाखवावेसे* वाटते. म्हातारपण *अहंकारी आणि हेकेखोर* असते,  तर ज्येष्ठत्व *अनुभवसंपन्न, विनम्र व संयमी* असते. म्हातारपण *तरुणांच्या जीवनात लुडबुड* करते,  तर जेष्ठत्व तरुणांना *त्यांच्या मताप्रमाणे जगण्याचा अवकाश देते.* म्हातारपण *'आमच्या वेळी असे होते'* अशी किरकिर लावते, तर जेष्ठत्व *बदलत्या काळाशी जुळवून घेते.* म्हातारपण आपली  *मते तरुणाईवर लादू पहाते*,  तर जेष्ठत्व *तरुणाईची मते जाणून घेते.*  म्हातारपण जीवनाच्या संध्याकाळी *मरणाची वाट पहात* दिवस कंठते, तर ज्येष्ठत्व जीवनाच्या संध्याकाळी सुध्दा *उष:काळाची वाट पाहत बालक्रिडा वा तरुणांचे दिपवणारे कर्तत्व कौतुक भरलेल्या नजरेने पाहत आनंदाने* जीवन जगत असते. थोडक्यात काय तर... *ज्येष्ठत्व अन्...

मल्लखांब

खेळ मातीतला : -  मल्लखांब... भारतात अनेक विविध खेळ खेळले जातात. यापैकी काही बैठे, मैदानी, सभागृहातील, पायावरील इ. खेळ आहेत. या सदरात आपण मल्लखांब या अस्सल मराठमोळ्या खेळाच्या प्रकरांविषयी जाणून घेणार आहोत. लाकडी (पुरलेला) मल्लखांब  हा जमिनीवर उभा या प्रकारात मोडतो. हा मल्लखांब सागवान किंवा शिसम या लाकडापासून बनवितात. हल्ली शक्यतो सागवानपासूनच याची निर्मिती होते. या मल्लखांबाला एरंडेल तेल लावल्याने घर्षण कमी होते. सध्या हा मल्लखांब स्पर्धात्मकदृष्ट्याही उपयोगात आणला जातो. हा मल्लखांब शरीराचा वरील भाग (बोंड), मान व मल्लखांबाचे शरीर अशा तीन भागांत सरळसोटपणे असतो. बोंड हे गोलाकार असते त्याखालोखाल मल्लखांबाची मान व नंतर शरीर असे असते. या मल्लखांबाची उंची १० फूट म्हणजे जमिनीवरील ८ फूट व जमिनीखाली २ फूट असते. किंवा १२ फूट म्हणजेच जमिनीवर १० फूट व जमिनीखाली २ फूट अशीही असते. हा मल्लखांब जमिनीशी ९० अंश (काटकोनात) असतो. मल्लखांबातील या प्रकारात विविध आढ्या, उड्या, तेढ्या, वेल, कसरतीचे व ताकदीचे व्यायामप्रकार, आसन, बोंडावरील व्यायाम प्रकार, मानेतील व्यायामप्रकार, शिडी, दसरंग, उतरत्या, फर...